सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधिकेला मनाचे चिंतन करतांना सुचलेली विचारप्रक्रिया

कु. मनीषा माहुर

१. संत अहं न्यून करण्यासाठी साधकाला साहाय्य करत असणे आणि अनिष्ट शक्ती स्वभावदोषांच्या साहाय्याने साधकांच्या मनावर नियंत्रण मिळवत असणे

‘आपला अहंचा संस्कार न्यून करण्यासाठी संत आपल्याला रागावतात किंवा आपली चूक सांगतात. संत आपल्याला रागावतात; म्हणून आपल्या मनाला वाईट वाटते. ज्या वेळी एखादी व्यक्ती किंवा संत आपले स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू सांगून ते न्यून करण्याचा प्रयत्न करत असतील, त्या वेळी अनिष्ट शक्ती आपल्या मनातील नकारात्मक विचार वाढवतात. तेव्हा ‘मनात येणारे नकारात्मक विचार हे आपले नसून ते अनिष्ट शक्तीचे आहेत’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनिष्ट शक्ती आपले स्वभावदोष आणि अहं न्यून होण्यास साहाय्य करत नाहीत; कारण त्यांच्या साहाय्याने त्या आपल्या मनावर नियंत्रण मिळवतात.

२. साधकामध्ये जेवढे गुण, तेवढे ईश्वराचे अस्तित्व असणे आणि त्यासाठी साधकांनी स्वतःतील गुण वाढवून मनातील ईश्वराला जागृत करणे

अशा वेळी ईश्वराला आपले गुण वाढवण्यासाठी प्रार्थना करून अनिष्ट शक्ती नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘संतांच्या वाणीमुळे आपल्यातील अनिष्ट शक्ती, स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना केली पाहिजे. ईश्वर सर्वगुणसंपन्न आहे. साधकामध्ये जेवढे गुण असतात, तेवढे ईश्वराचे अस्तित्व असते. त्यासाठी साधकांनी स्वतःतील गुण वाढवून मनातील ईश्वराला जागृत करायचे आहे.’

– कु. मनीषा माहुर , मथुरा सेवाकेंद्र (१३.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक