पू. भगवंत कुमार मेनराय यांचे अंत्यदर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

४.६.२०२४ या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी देहत्याग केला. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. सोनाली पोत्रेकर

१. मी पू. मेनराय आजोबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेल्यावर माझ्या चेहर्‍यावर स्पंदने जाणवली.

२. पू. आजोबांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटत नव्हते.

३. त्यांचा देह तेजस्वी आणि शांत वाटत होता.

४. ‘त्यांच्याकडून सर्व साधकांकडे प्रीतीची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले.

५. मला वातावरणात हलकेपणा जाणवला.

६. तेथे सेवेत असलेले सर्व जण ‘स्थिर आणि सहजभावात आहेत’, असे मला वाटले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला या अनुभूती आल्या, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सोनाली पोत्रेकर, फोंडा, गोवा. (६.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक