
खामगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – ‘आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरीही या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने तालुक्यातील शहापूर येथील शेतकर्यांनी ५ जूनपासून स्थानिक ग्रामपंचायती समोर ‘आमरण उपोषण’ चालू केले आहे. दीड महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी पसार असल्याने अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे. या उपोषणात रामकृष्ण मोरखडे, रामदास चराटे, भास्कर कोगदे आदी सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी सागर मेतकर यांना शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ग्राम शहापूर येथील सुनील हरिदास पारखेडे, गणेश हरिदास पारखेडे, हरिदास उपाख्य हरिभाऊ दौलत पारखेडे यांनी शेतकर्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १ एप्रिल २०२४ या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.
या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी सुनील पारखेडे हा पसार असून सहआरोपी गणेश पारखेडे, हरिदास पारखेडे हे जामिनावर सुटले आहेत. हे आरोपी वेगवेगळ्या पद्धतीने तक्रादारावर दबाव आणत असून तक्रारीच्या विरोधात खोटे गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या देत आहेत. या प्रकरणामध्ये अन्वेषणाच्या संदर्भात ५० ते ५२ दिवसांचा कालावधी उलटूनही मुख्य आरोपी पसार असून अन्वेषणयंत्रणा अन्वेषण करण्यामध्ये असक्षम ठरलेली आहे. (साध्या गुन्ह्यातील आरोपींना अटक न करणारे असे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन