
कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) – अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि ‘दुर्गराज रायगड’ प्रतिवर्षी रायगडावर भव्यदिव्य शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाचे हे ३५० वे वर्ष असून या सोहळ्याच्या निमित्ताने ‘कोल्हापूर हायकर्स’ची ‘पवित्र जल संकलन’ मोहीम राबवत आहे. यासाठी १ मेपासून देशभरातील विविध ठिकाणांहून हे जल संकलित करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती ‘कोल्हापूर हायकर्स’चे संस्थापक श्री. सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी श्रावणी पाटील, विजय ससे, डॉ. राजेंद्र भस्मे यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. सागर म्हणाले, ‘‘संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व आहेच; म्हणून या राज्याभिषेक सोहळ्याची सिद्धता आम्ही आधीपासूनच करत असतो. अशा प्रकारे सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून प्रत्येक वर्षी ‘कोल्हापूर हायकर्स’चे मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल आणतात. विविध ठिकाणांहून आणलेले हे पवित्र जल एकत्रित करून ५ जूनला रायगडावर पोचवणार आहोत.’’
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
परदेशी वृत्तमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे सामर्थ्य !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !