शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले ! – फडणवीस

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धा – शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले, त्यासाठी आभारी आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना उद्देशून लगावला. वर्धा येथे महायुतीला उमेदवार सापडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ते येथे बोलत होते. पैलवान रामदास तडस यांचा अर्ज भरण्याच्या वेळी त्यांनी वरील टीका केली.

पूर्वी शरद पवार येथे येऊन गेले होते, त्यांनी काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. त्यांनी पंजा येथून गायब करून दाखवला. महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने येथे राजकारण केले. काँग्रेसला पवार यांनी हद्दपार केले, असे फडणवीस या वेळी म्हणाले.