हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती. या प्रकरणी भाईंदर येथील नरेश निळे यांनी मोर्चा आणि सभा यांसाठी अनुमती मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्त्यांद्वारे याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने मोर्चा अन् सभा यांना अनुमती दिली. नरेश निळे यांनी मिरवणूक काढून सभेसाठी अनुमती मागितली होती; मात्र ‘१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान येणार असल्याने ही सभा पुढे ढकलावी’, अशी विनंती पोलिसांनी आयोजकांना केली होती.’ (२४.२.२०२४)