करगणी (आटपाडी) येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदु तरुणीचे धर्मांतर आणि हत्या !

पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना निवेदन देतांना श्री. दत्तात्रय खेमनर (डावीकडे) आणि अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय हळनूर

आटपाडी (जिल्हा सांगली), १८ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील आटपाडी येथील करगणी गावातील धनगर समाजातील तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून तिचे धर्मांतर करून तिची हत्या केली आहे. या प्रकरणी ‘तिचा पती इरफान कल्लंदर इनामदार याच्यावर तरुणीचे धर्मांतर, शारीरिक आणि मानसिक छळ करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्याला त्वरित अटक करावी. अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने आटपाडी पोलीस ठाण्यावर ८ दिवसांत भव्य मोर्चा काढण्यात येईल’, अशी चेतावणी ‘अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद’ आणि आणि ‘सकल धनगर समाजा’च्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते ! – संपादक)

‘इरफानने १०-१२ वर्षे हिंदु तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यानंतर तरुणीने २ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे प्रथमदर्शनी लक्षात येते; परंतु या संदर्भात अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेने आवाज उठवत ‘या घटनेमागे तिच्या पतीचा हात असून ही आत्महत्या नसून हत्या आहे’, असा आरोप केला आहे.

या घटनेमध्ये संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. तिने ‘तिच्या जीविताला धोका आहे’, असे आत्महत्या करण्याअगोदर काही जवळील लोकांना दूरभाष करून सांगितले होते. त्यामुळे पोलीस खात्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील सर्व भ्रमणभाष संपर्क पडताळून त्या चिठ्ठीच्या आधारे इरफान याच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी करून पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवेदन दिले आहे.

संपादकीय भूमिका :

  • ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून हिंदु तरुणीचे धर्मांतर आणि तिची हत्या करणार्‍या धर्मांध पतीस अटक करावी !
  • अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !