Vegetarian Shri Ram : श्रीरामाने वनवासामध्ये मांसाहार केल्याचे कोणत्याही ग्रंथांत लिहिलेले नाही !

श्रीरामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची स्पष्टोक्ती !

जितेंद्र आव्हाड आणि श्रीरामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर श्रीरामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे काही बोलत आहेत, ते खोटे आहे. श्रीराम वनवासामध्ये असतांना त्याने मांसाहार केला, असे कोणत्याही ग्रंथांत लिहिलेले नाही. ते वनवासामध्ये कंदमुळे खात होते, हे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे.

कारवाई झाली नाही, तर मी आव्हाड यांना मारणार !  – परमहंस आचार्य

अयोध्येचे परमहंस आचार्य यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान अवमानकारक आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. मी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांना आग्रह करीन की, त्यांनी आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी. जर कठोर कारवाई झाली नाही, तर मी स्वतः आव्हाड यांना मारून टाकेन.