भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे ! – आमदार नितेश राणे, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात हिंदू युवती आणि महिलांना खोटी स्वप्ने दाखवून फसवले जाते. हिंदू युवतींशी लग्न करून त्यांना विविध इस्लामी देशांत विकले गेल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. जिहाद्यांना वर्ष २०४७ मध्ये ‘भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे’, त्यासाठी हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून हिंदूंची लोकसंख्या न्यून करण्याचा प्रयत्न चालू आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.