भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

चक्रवाकाला (चक्रवाक पक्षी) सुख देण्यासाठी सूर्याने धावत यावे, तसा संकटाने गांजलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून येतो; कारण परमेश्वर हा जीवाचा स्वामी आहे. भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणे, हे त्याचे कर्तव्य आहे; पण त्यासाठी साधकाने काय करावे ? त्याचे उत्तर ‘हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी’, या चरणात देत आहे. परमेश्वर आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही आणि भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे. – प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)