२० ऑक्टोबरपासून हलक्या वाहनांसाठी चालू होणार म्हाप्रळ-आंबेत पूल

बंद असलेला म्हाप्रळ- आंबेत पूल

रत्नागिरी – मागील २ वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणासाठी बंद असलेला म्हाप्रळ- आंबेत पूल २० ऑक्टोबरपासून दुचाकी आणि हलक्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

(सौजन्य :लोकशाही मराठी )

रत्नागिरी आणि रायगड या २ जिल्ह्यांना जोडणारा हा पूल गेल्या २ वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आता होता. त्यामुळे मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांतील वाहतूक महाडमार्गे वळवण्यात आली होती. याच समवेत या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनांसाठी विनामूल्य बोट वाहतुकीचा पर्यायही शासनाने उपलब्ध करून दिला आहे.