|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण मानवी तस्करी करत होते. बांगलादेशींना भारतात आणून वसवण्यासाठी त्यांना विदेशातून २० कोटी रुपये देण्यात आले होते. त्यांच्या बँक खात्यांतून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आदिल महंमद अशर्फी उपाख्य आदिल उर रहमान, शेख नजीबुल हक आणि अबू हुरायरा गाजी अशी या तिघांची नावे आहेत.
१. आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, मानव तस्करी करणारे बांगलादेशींना भारतात आणून वसवण्यासाठी ते भारतीय नागरिकत्वाची खोटी कागदपत्रे बनवत होते. त्यासाठी त्यांना विदेशातून अर्थपुरवठा करण्यात येत होता. यांतील आदिल या मुख्य सूत्रधार होता. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. बनावट कागदपत्रांसाठी त्याला बंगालमध्ये रहाणार्या शेख नजीबुल हक आणि अबु हुरायरा गाजी यांनी साहाय्य केले.
२. या चौकशीत विदेशातील काही खासगी संस्थांकडून मदरसे आणि शाळा यांना अर्पण स्वरूपात २० कोटी रुपये पाठवण्यात आले होते, हे समोर आले. याचा वापर मानव तस्करीसाठी केला जात होता.
संपादकीय भूमिकाअशांना सरकारने फाशीची शिक्षा दिल्यावरच अशा घटना थांबतील ! |
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman