हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १२

‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल. ज्या हिंदूंमध्ये लेखात वर्णित केल्याप्रमाणे हिंदुत्वाचे गुणधर्म आहेत, त्यालाच हिंदुत्वनिष्ठ म्हणता येईल. हिंदु धर्मात जन्म झाला म्हणून कुणी हिंदुत्वनिष्ठ होत नाही. हिंदुत्वनिष्ठ होण्यासाठी केवळ जन्माने हिंदु असून चालणार नाही, तर तो वाचा, विचार आणि आचार यांनीही हिंदु असला पाहिजे. केवळ जन्महिंदु नव्हे, तर तो कर्महिंदूही असला पाहिजे. आज या देशात कर्महिंदू फार अल्प; पण जन्महिंदूंची संख्या मात्र पुष्कळ मोठी आहे. या जन्महिंदूंना ‘अपघाताने झालेले हिंदू’ असेही म्हणता येईल.

१. जन्महिंदूंमुळे हिंदू त्यांच्याच हिंदुस्थानात परके !

‘भारत देश फार पूर्वीपासून ‘हिंदुस्थान’ म्हणूनही ओळखला जातो. ऋग्वेदात म्हटले आहे,
हिमालयं समारभ्य यावत् सिन्धुसरोवरम् ।
तद्देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ॥ – बार्हस्पत्यशास्त्र
अर्थ : हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत (म्हणजे सिंधु सरोवरापर्यंत) पसरलेल्या देवनिर्मित देशाला ‘हिंदुस्थान’ असे नाव आहे.

इतर धर्माची निर्मिती होण्याच्या सहस्रो वर्षे अगोदरच सनातन धर्माची, जो आज हिंदु धर्म म्हणून ओळखला जातो, त्याची निर्मिती झाली होती. आर्य म्हणजे हिंदु. हे मूळचे इथलेच. ते कुठून बाहेरून आले नव्हते. हिंदु धर्माच्या निर्मितीनंतर सहस्रो वर्षांनी ख्रिस्ती, मुसलमान, यहुदी इत्यादी अनेक धर्मांची निर्मिती झाली. या विविध अनुयायांनाही हिंदूंनी उदारपणे आश्रय दिला; पण सध्या एका अरबी कथेतील अरबी प्रवाशाप्रमाणे या हिंदूंच्या मातृभूमीतच हिंदूंची दयनीय अवस्था झाली आहे. अरबी प्रवाशाने दया आणि माणुसकी म्हणून रात्रीच्या वेळी आपल्या समवेतच्या उंटाचे थंडीपासून रक्षण व्हावे, यासाठी त्याला आपली मान तंबूमध्ये घुसवू दिली; पण पुढे उंट आपले एकेक अवयव तंबूत घुसवत राहिला आणि त्यामुळे तंबूतील अरबी प्रवाशाला त्याचा एकेक अवयव स्वीकारावा लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, उंट पूर्णपणे तंबूत घुसून आरामात विसावला आणि अरबी प्रवाशाला नाईलाजाने तंबूच्या बाहेर पडून रात्रभर थंडीत कुडकुडत रात्र जागून काढावी लागली. आज भारतातील हिंदूंची अवस्था त्या अरबी प्रवाशाप्रमाणेच झाली आहे. ज्यांना हिंदूंनी उदारपणे आश्रय दिला होता; ते घुसखोरच आता बहुसंख्य असून मूळचे हिंदू आक्रसत आणि विस्थापित होत चालले आहेत. काश्मीरमधून ५ लाख हिंदूंना जसे त्यांचे घरदार, शेतीवाडी आणि मंदिरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे, तसे मुसलमान अन् ख्रिस्ती बहुसंख्य झालेल्या भारतातील अनेक गावांतून अन् वस्त्या यांमधून असुरक्षित झाल्यामुळे हिंदू पलायन करू लागले आहेत. या देशाचे मूळ रहिवासी आणि सध्या तरी बहुसंख्य असणार्‍या हिंदूंना दुय्यम दर्जा प्राप्त झाला असून मुसलमान अन् ख्रिस्ती, हे या देशाचे प्रथम दर्जाचे नागरिक झाले आहेत. हिंदूंची ही दयनीय अवस्था अपघाताने झालेल्या जन्महिंदूंनीच केली आहे. काही वर्षांपूर्वी या देशाचे पंतप्रधान या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या हिंदु धर्मातील शीख पंथाच्या नेत्याने उघडपणे विधान केले होते, ‘या देशातील सर्व संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे.’

श्री. शंकर गो. पांडे

२. धर्मांधांच्या पूर्वनियोजित दंगलींमुळे कायमच हिंदूंची जीवित आणि वित्त हानी !

सध्या तरी या देशात हिंदू बहुसंख्य आहेत; पण ते त्यांच्या मातृभूमीतच कायम असुरक्षित आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या देशातील धार्मिक दंगलीवर नियंत्रण आले आहे. अन्यथा धार्मिक दंगली या देशाच्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर या देशात अक्षरश: सहस्रो दंगली झाल्या आहेत. या दंगलीत हिंदूंची जीवित आणि वित्त यांची प्रचंड हानी झाली आहे. या दंगलींचा इतिहास पाहिला तर दिसून येते की, दंगल घडवण्यास या देशातील तथाकथित अल्पसंख्यांकांना क्षुल्लक कारणही पुरेसे होते; मग हे कारण म्हणजे देशातील एखाद्या कोपर्‍यात घडलेली घटना असो किंवा जगातील कोणत्याही देशात घडलेली घटना असो. विशेष म्हणजे धर्मांधांकडून चालू करण्यात येणार्‍या दंगली या पूर्वनियोजित आणि सर्व सिद्धतेनिशी घडवलेल्या असतात. ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा)च्या विरोधात देहली येथे घडवलेली दंगल, त्रिपुरा येथे न पाडल्या गेलेल्या मशिदीचे निमित्त करून रझा अकादमीने महाराष्ट्राच्या अनेक गावांत घडवलेल्या दंगली, या दंगलींचे निरीक्षण केल्यास त्या कशा पूर्वनियोजित आणि पूर्ण सिद्धतेनिशी केल्या होत्या, हे लक्षात येते. अल्पसंख्यांकांच्या अशा पूर्वनियोजित दंगलींमुळे जीवित आणि वित्त हानी मात्र हिंदूंची होते. हिंदु समाजाची दंगलीच्या क्रियेवर प्रतिक्रिया उमटते, तेव्हा मात्र अपघाताने जन्मलेले हिंदु नेते हिंदूंनाच अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात.

३. हिंदूंवर ‘मॉब लिचिंग’चा (समूहाने केलेली हत्या) आरोप करून प्रत्यक्षात मात्र हिंदूंचेच ‘मॉब लिचिंग’ करणे !

मुळात या देशातील हिंदूच असुरक्षित झालेला असला, तरी असुरक्षित झाल्याच्या बोंबा जेव्हा काही मुसलमान नटनट्या, नेते आणि अपघाताने जन्मलेले तथाकथित बुद्धीवादी हिंदु मारू लागतात, त्यांचे पुरस्कार परत करू लागतात, तेव्हा संताप आल्याखेरीज रहात नाही. एक अखलाक मारला गेला, तर काही जन्महिंदु बुद्धीवंतानी बेंबीपासून आरडाओरड केली, त्यांचे पुरस्कार परत केले. त्यांनीच भारतात कधीही प्रचलित नसलेल्या ‘मॉब लिचिंग’चा शोध लावला, हिंदुविरोधी वृत्तपत्रांनी यावर रकाने भरभरून लिखाण केले, हिंदुविरोधी आणि विकल्या गेलेल्या वाहिन्यांनी या घटनेवर दिवसरात्र चर्चा घडवून आणल्या अन् हिंदूंनाच दोषी ठरवून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. हिंदुविरोधी राजकीय पक्ष आणि नेते यांना तर अखलाकच्या निमित्ताने हिंदूंना झोडून काढण्याची आयतीच संधी मिळाली अन् या संधीचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला; पण धर्मांध मुसलमानांकडून जेव्हा हिंदूंच्या क्रौर्यतेने हत्या केल्या जातात, ते हा हिंदुविरोधी बुद्धीवादी, राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमे यांवर एका शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करता  मूग गिळून गप्प बसतात. आजपर्यंत क्षुल्लक कारणाचे निमित्त होऊन सहस्रो हिंदू हे धर्मांध मुसलमानांकडून मारले गेले आहेत. विस्तारभयास्तव यांची मोजकीच उदाहरणे देणे क्रमप्राप्त आहे.

४. धर्मांधांकडून हत्या करण्यात आलेले हिंदू

देहली येथील डॉ. नारंग, अंकित सक्सेना, ध्रुव त्यागी; उत्तरप्रदेशमधील आगरा येथील अरुण माहौर, मथुरा येथील एक लस्सी विक्रेता भरत यादव, प्रयागराज येथील हिमा तलरेजा, कासगंज मेथील चंदन गुप्ता, मेरठमधील सरघना येथील तरुण गोपाल, मुजफ्फर येथील आते-मामे भाऊ सचिन आणि गौरव; कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील रामलिंगम्, बडोदरा (गुजरात) येथील मनहार बारिया, कोदुनगालुर (केरळ) येथील मिनू मोहन, पुणे येथील सावन राठोड, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि काळी दौलत येथील अनुक्रमे डॉ. धर्मकारे अन् शाम राठोड; हिजाब विरोधात सामाजिक माध्यमांवर मत व्यक्त केल्यामुळे कर्नाटकातील शिवमोग्गा येथील हर्षा; ‘भगवान श्रीकृष्ण कसे श्रेष्ठ आहेत’, हे सांगणारा ‘व्हिडिओ’ प्रसारित केला म्हणून हरियाणामधील रेवारी येथील किसन भारद्वाज; तसेच सरस्वती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे झारखंडमधील घुलमहा येथील रूपेश पांडे, या सर्व हिंदूंचे अगदी क्षुल्लक कारणामुळे धर्मांधांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली ! ही काही मोजकी ज्ञात उदाहरणे आहेत. धर्मांधांकडून मारल्या गेलेल्या अज्ञात हिंदूंची उदाहरणे अजून किती असतील, हे त्या परमेश्वरालाच ठाऊक !

५. हिंदूबहुल देशात हिंदूच अधिक असुरक्षित !

बंगाल आणि केरळ मध्ये भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या सहस्रो हिंदु कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या नृशंसपणे हत्या झाल्या आहेत; पण ‘मॉब लिचिंग’मध्ये जेव्हा धर्मांधांकडून हिंदू मारले जातात, तेव्हा आमचे तथाकथित धर्मनिरपेक्ष अन् जन्महिंदु नेते, बुद्धीवादी, पुरस्कार परत करणारी जन्महिंदूंची टोळी, तथाकथित धर्मनिरपेक्ष वृत्तपत्रे, तसेच वाहिन्या या सर्वांची जीभ टाळूला चिकटते आणि ते आपल्या चोची वाळूत खुपसून स्वस्थ बसतात. म्हणूनच मी ठामपणे म्हणतो की, या हिंदूबहुल देशात सध्या मुसलमानच नव्हे, तर हिंदूच अधिक असुरक्षित झाला आहे आणि याला अपघाताने जन्मलेले हिंदूच उत्तरदायी आहेत !

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ

संपादकीय भूमिका

‘मॉब लिचिंग’ मध्ये धर्मांधांकडून जेव्हा हिंदू मारले जातात, तेव्हा तथाकथित निधर्मी आणि जन्महिंदू नेते, बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी कुठे असतात ?