
भाग्यनगर – केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या एकाही सरकारने देशातील तरुणांना या महान दिवसाची माहिती दिली नाही. या दिवसाची माहिती लोकांना कळावी, यासाठी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला गेला नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे सत्ताधार्यांच्या मनात भीती होती. त्यामुळे त्यांनी हा दिवस साजरा केला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने ३९९ दिवस राज्य केले. या काळात तेथील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. सरदार पटेल यांनी ४०० व्या दिवशी या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.’’ १७ सप्टेंबर या दिवशी तेलंगाणा निजामच्या कह्यातून मुक्त झाला. तो दिवस तेलंगाणा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !