नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्‍थान !

हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (मेवात, हरियाणा) हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्‍या अन्‍वेषणातून आता एक एक पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते. २५ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘दंगलीला निमित्त जलाभिषेक यात्रेचे, गोरक्षक मोनू मानेसरचा व्‍हिडिओ दंगलीसाठी केवळ निमित्त आणि धर्मांध, जिहादी दंगलखोरांकडे शस्‍त्रे आली कुठून ?’, हा भाग वाचला. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/714214.html

नूंह येथील दंगलीच्‍या वेळी जाळलेली वाहने

४. मेवातची दंगल हे पूर्वनियोजित षड्‌यंत्रच

ही घडवून आणलेली दंगल पूर्वनियोजितच होती, याचे पुरावे अनेक आहेत. त्‍यापैकी काही असे –

अ. तथाकथित व्‍हिडिओवरून विधानसभेत काँग्रेसचे आमदार मम्‍मन खान धमकी देतांना म्‍हणाले होते, ‘मोनू मानेसार की प्‍याज सी फोड देंगे ।’

आ. जबीर घट्‍मिका यांनी २५ जुलै या दिवशी एका व्‍हिडिओ संदेशात ‘हरियाणा पोलिसांनी मेवातमध्‍ये प्रवेश केल्‍यास त्‍यांचे तुकडे तुकडे करण्‍यात येतील’, अशी सरळ धमकी दिली.

इ. इतकेच काय, तर नरसंहाराच्‍या आदल्‍या रात्री रस्‍त्‍यावर भरलेल्‍या गॅस सिलिंडरने घेराव घालून रस्‍ते बंद करण्‍यात आले.

ई. मोनू मानेसर मेवातला आलाच नाही, तरीही दंगल झाली. याचा अर्थ धर्मांध जिहाद्यांना दंगल करायचीच होती आणि बर्‍याच आधीपासून त्‍याची पूर्वसिद्धताही करण्‍यात आली होती.

उ. हिंसाचारानंतर अनेक आरोपी राजस्‍थानमधील मेवात, जयपूर आणि उदयपूर अन् उत्तरप्रदेशातील मेरठ, आगरा, तसेच अलीगड येथे लपल्‍याची माहिती अटकेतील तरुणांनी दिली. याचाच अर्थ दंगलीनंतर लपण्‍याची ठिकाणेही ठरवण्‍यात आली होती.

ऊ. मानसिक संतुलन ढळलेल्‍या राज्‍य राखीव दलाच्‍या पोलिसाने घटनेच्‍या २ दिवस आधी रेल्‍वेत केलेला गोळीबार हा जणू काही मुसलमान प्रवाशांना लक्ष्य करूनच केला होता, असे अनेक जिहादी, धर्मांध सामाजिक माध्‍यमांकडून विकृत पद्धतीने दाखवण्‍यात आले.

ए. गुरुग्राम आणि आजूबाजूच्‍या भागातील धर्मांध, जिहादी मुसलमान समाजाला बोलावून अशांतता निर्माण करण्‍यासाठी एक साधन म्‍हणून सोशल मिडियाचा वापर केला गेला.

ऐ. ‘या दंगलीच्‍या वेळी धर्मांध जिहादी दंगलखोरांकडून अनुमाने १ सहस्र राऊंड फायरिंग करण्‍यात आले’, असे पोलिसांकडून सांगण्‍यात आले आहे.

हे आणि असे अनेक पुरावे, धर्मांध जिहादींची सिद्धता अतिशय सुनियोजित होती, हेच अधोरेखित करतात.

५. नूंह, मेवात आणि धर्मांधता

नूंह या जिल्‍ह्याचे आधीचे नाव ‘मेवात’ असे होते. ते भाजपच्‍या खट्टर सरकारने पालटले. मेवात हा भौगोलिक प्रदेश हरियाणा, पश्‍चिमी उत्तरप्रदेश, राजस्‍थान आणि देहली या ४ राज्‍यांमध्‍ये विखुरलेला आहे. नूंह जिल्‍ह्यात जवळपास ८० टक्‍के लोकवस्‍ती मुसलमान, तर उरलेले केवळ २० टक्‍के हिंदु आहेत. आज तिथे उफाळलेल्‍या हिंसाचाराची कारणे वरवर तात्‍कालिक वाटली, तरी बर्‍याच काळापासून जातीय तेढ वाढते आहे; कारण ‘ज्‍या प्रदेशात मुसलमानांची लोकसंख्‍या ३० टक्‍क्‍यांच्‍या वर जाते, तिथे राज्‍यघटना झुगारून शरीयत रेटण्‍याचा प्रयत्न होतो’, असे निरीक्षण आहे. या भागात तर ८० टक्‍क्‍यांहून अधिक मुसलमान आहेत, तेव्‍हा धार्मिक तेढ वाढण्‍यात याचे पर्यवसान होणे स्‍वाभाविक आहे.

नूंह जिल्‍ह्यात विश्‍व हिंदु परिषदेच्‍या माध्‍यमातून ब्रजमंडल जलाभिषेक यात्रा गेली ४ वर्षे निघत आहे. हिंदु श्रद्धेच्‍या पवित्र स्‍थानांना पुनर्जीवित करण्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने ही यात्रा आयोजित केलेली आहे. येथे महाभारतातील पांडवकालीन ३ शिवलिंगे असल्‍याचे सांगितले जाते, तसेच श्रीकृष्‍ण त्‍याच्‍या गायी चरण्‍यासाठी याच ठिकाणी आणत असल्‍याचीही कथा या भागात प्रसिद्ध आहे. विहिंपच्‍या कार्यकर्त्‍यांचे म्‍हणणे आहे की, हिंदूंसाठी महत्त्वाच्‍या असणार्‍या या धार्मिक स्‍थळांवर या क्षेत्रातील अन्‍य धर्मीय लोकांकडून अतिक्रमण होण्‍याचा धोका असल्‍याने संभाव्‍य लँड (भूमी) जिहाद रोखण्‍यासाठी विहिंपने ही यात्रा चालू केली आहे.

यंदाच्‍या अधिक श्रावण मासामुळे या वर्षीची यात्रा सकल हिंदु समाजासाठी पर्वणीच होती. अरवली पर्वतरांगांमधील प्राचीन नलहार शिवमंदिरातून ही यात्रा निघाली. या यात्रेत अनुमाने ५ सहस्र हिंदु भाविक सहभागी झाले. एकूण ४५ किलोमीटरचा हा प्रवास आहे; मात्र यात्रा १-२ किलोमीटर जाते ना जाते, तोच धर्मांध आणि जिहादी यांचा पूर्वनियोजित क्रूर हिंसाचार चालू झाला. त्‍यामुळे यात्रेतील भेदरलेल्‍या हिंदु महिला आणि मुले यांनी नलहार मंदिरात आश्रय घेतला. या सर्व हिंदु महिला आणि मुले यांना धर्मांध जिहाद्यांनी  सर्व बाजूंनी घेरले होते. पोलीस आणि निमलष्‍करी दलाचे सैनिक वेळेवर पोचले नसते, तर या हिंदूबहुल स्‍वतंत्र भारतात १६ ऑगस्‍ट १९४६ च्‍या कायदे आझम महंमद अली जीनांच्‍या ‘डायरेक्‍ट अ‍ॅक्‍शन डे’ (नरसंहार करण्‍यासाठी थेट कृतीचा दिवस)ची पुनरावृत्ती झाली असती. ही कल्‍पनाही जिवाचा थरकाप उडवणारी आहे.

हा सगळा परिसर राजस्‍थान, हरियाणा, उत्तरप्रदेश ही राज्‍ये आणि देहली हे केंद्रशासित राज्‍य या ४ राज्‍य प्रशासनांना गेल्‍या काही वर्षांपासून आव्‍हान ठरत आहे. त्‍याला आता धर्मांधांचा जिहादी रंग आल्‍याने हे आव्‍हान अधिकाधिक अवघड होत चालले आहे. ‘गुन्‍हा करायचा आणि इतर राज्‍यांमध्‍ये लपून बसायचे’, अशी या धर्मांध आणि जिहादी गुन्‍हेगारांची पद्धत आहे.

६. सायबर गुन्‍ह्यांचा मोठा अड्डा

गेल्‍या काही वर्षांत गुरुग्रामला लागून असणारा हा नूंह जिल्‍हा सायबर गुन्‍ह्यांचा देशातील सर्वांत मोठा अड्डा बनला आहे. अलीकडेच २७ एप्रिल या दिवशी तेथील १४ गावांमध्‍ये ५ सहस्र पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी धाड टाकून १०० हून अधिक सायबर गुन्‍हेगारांना पकडले. पकडले गेलेले हे बहुतांश सारे मुसलमान समाजातील होते. ही धाड टाकल्‍यानंतर देशातील सायबर गुन्‍ह्यांच्‍या तक्रारी एकदम २६ टक्‍क्‍यांनी घटल्‍या होत्‍या. तेथील सायबर गुन्‍ह्यांना आवर घालण्‍यासाठी हरियाणा पोलिसांनी तेथे एक ‘विशेष सायबर क्राईम’ कार्यालयही चालू केले आहे.

पूर्वनियोजित दंगलीत धर्मांध, जिहादी दंगलखोरांनी हे ‘विशेष सायबर क्राईम’ कार्यालय पद्धतशीरपणे जाळून त्‍याची अक्षरश: राखरांगोळी केली. फिरोजपूर येथे जाणारी सरकारी बस दादागिरीने कह्यात घेऊन सायबर क्राईम कार्यालयाच्‍या २ पोलीस गाड्यांना धडक मारून उडवून दिले. तसेच ती बस कार्यालयाच्‍या भिंतीवर आपटून फोडली. आगीतून बचावलेली सायबर क्राईम पुराव्‍यांची कागदपत्रे घेऊन धर्मांधांनी पोबारा केला. अशा प्रकारे सायबर गुन्‍ह्यांमधील सर्व पुरावे सुनियोजितरित्‍या नष्‍ट करण्‍यात आले.

७. पाकिस्‍तानशी जोडले गेलेले हिंसाचाराचे धागेदोरे

हरियाणाच्‍या नूंहमध्‍ये झालेल्‍या धार्मिक हिंसाचाराशी पाकिस्‍तानशी असलेले संबंध  समोर आले आहेत. पाकिस्‍तानमधील ‘अहसान मेवाती’ नावाच्‍या यूट्यूबरने नूंहच्‍या हिंसाचाराशी संबंधित चिथावणीखोर व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केला असल्‍याचे अन्‍वेषणात समजले आहे. या व्‍हिडिओमध्‍ये तो नूंह हिंसाचाराच्‍या वेळी उघडपणे हिंदूंना उद्देशून अपशब्‍द वापरत होता आणि लोकांना हिंसाचारासाठी भडकवतांनाही दिसत होता. अहसान मेवाती याने ‘मोनू मानेसार यांना मारण्‍यासाठी आणि हिंसाचार भडकण्‍यास साहाय्‍यभूत ठरेल’, अशी अनेक विधाने केली होती. याखेरीज त्‍याने मुसलमानांची एकजूट आणि हिंदूंविरुद्ध जिहाद अन् द्वेषमूलक अपशब्‍दही वापरले होते. पोलीस अशा प्रकारच्‍या आणखी प्रक्षोभक सामाजिक माध्‍यमांचे अन्‍वेषण करत आहेत.

८. रोहिंग्‍यांचाही सहभाग ?

नूंहच्‍या हिंसेचे धागेदोरे घुसखोर रोहिंग्‍यांच्‍या मुसलमान वस्‍तीपर्यंत पोचले आहेत. स्‍थानिकांच्‍या साहाय्‍याने म्‍यानमारमधून घुसखोरी करून आलेले हे रोहिंग्‍या हिंसाचारात सहभागी होतात, हे हिंदु समाजाचे डोळे उघडणारे वास्‍तव आहे. याविषयीचा तपशील प्रथमदर्शनी अहवालामध्‍ये नोंदवण्‍यात आला आहे. पोलिसांनी या दंगलीचे अन्‍वेषण चालू करतांना अतिक्रमणाच्‍या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नूंहच्‍या जवळच असलेल्‍या तावडू रोहिंग्‍या आणि अतिक्रमण करणार्‍या इतर २०० झोपड्या जमीनदोस्‍त केल्‍या आहेत. या ठिकाणी अवैध पद्धतीने वास्‍तव्‍य करणार्‍या लोकांचा या दंगलीमध्‍ये सहभाग असल्‍याचे पोलीस अन्‍वेषणातून उघड झाले आहे.

या रोहिंग्‍या लोकांनी हरियाणा सरकारच्‍या शहरी विकास प्राधिकरणाच्‍या भूमीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्‍याचे म्‍हटले जात आहे. नूंहमध्‍ये झालेल्‍या हिंसाचारात रोहिंग्‍या लोकांचा सहभाग असल्‍याचे अन्‍वेषणात उघड झाल्‍यानंतर पोलिसांनी बुलडोझर लावले आणि सर्व अवैध झोपड्या उद़्‍ध्‍वस्‍त केल्‍या. या झोपड्यांमध्‍ये बांगलादेशी लोक मोठ्या प्रमाणात वास्‍तव्‍य करत असल्‍याचे समोर आले आहे.

९. जिहादी धर्मांधांची पूर्वसिद्धता

दंगलखोरांच्‍या दगडफेक आणि मारहाणीत कर्तव्‍यावर गणवेशात असलेल्‍या गुरसेवक सिंह या होमगार्डचा मृत्‍यू झाला. ३२ वर्षीय गुरसेवक १० वर्षांपूर्वी ‘होमगार्ड’मध्‍ये रुजू झाले होते. ७ जुलै या दिवशी त्‍यांची गुरुग्राम येथे तात्‍पुरती नियुक्‍ती करण्‍यात आली होती. गुरसेवक सिंह हे पोलीस पथकासह मेवातकडे जात असतांना दंगलखोरांनी वाहनांवर दगडफेक आणि गोळीबार केला. या घटनेत २ होमगार्ड पोलिसांना जीव गमवावा लागला, त्‍यापैकी एक गुरसेवक होते.

अभिषेक हा त्‍या यात्रेत सहभागी असलेला बजरंग दलाचा सक्रीय कार्यकर्ता. नलहार मंदिरात आश्रय घेतलेल्‍या हिंदु महिला आणि मुले यांच्‍या संरक्षणासाठी सशस्‍त्र धर्मांध आक्रमणकर्त्‍यांशी नि:शस्‍त्र असूनही लढला. परिणामी अभिषेक धारातीर्थी पडला; मात्र तोपर्यंत पोलीस आणि निमलष्‍करी दलांची कुमक पोचली अन् अनर्थ टळला. यावरून धर्मांधांची पूर्वसिद्धता लक्षात येईल.

१०. हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा

आतापर्यंत समोर आलेली आणि येत असलेली वस्‍तूस्‍थिती, म्‍हणजे या परिसरातील हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा आहे. हिंदूंचे खच्‍चीकरण करणे, त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांना धोका निर्माण करणे, तिथे कार्यरत असलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना पद्धतशीरपणे अपकीर्त करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून हिंदूंना जगणे नकोसे करणे, यांसाठी ही यात्रा म्‍हणजेे शोधलेले एक निमित्त आहे.

– पूनम पवार (साभार : ‘विश्‍व संवाद केंद्र, कोकण’चे फेसबुक)

संपादकीय भूमिका 

नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्‍यास भाग पाडणे, हे काश्‍मीरप्रमाणेच घडवलेले दुष्‍कृत्‍य आहे, हे जाणा !