(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष

राजकारणात प्रवेश करण्यावर कॉकरोच जनता पक्षाची भूमिका

नवी देहली – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे नैतिक दायित्व स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या शिक्षणमंत्री पदाचे त्यागपत्र दिले. हा कॉकरोच जनता पक्षाचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. ३६ दिवसांचे आंदोलन थांबवल्यानंतर आता पक्षाच्या प्रवक्त्यांना ‘त्यांचा पक्ष राजकारणात प्रवेश करणार का ?’, असा प्रश्न विचारण्यात आला.  यावर पक्षप्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

दास म्हणाले की, आमचा भर युवकांच्या चळवळीला बळ देण्यावर आहे. सध्या आमचे ध्येय ही चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यावर आहे. भारतात अगोदरच ७५० ते ८०० राजकीय पक्ष अस्तित्वात असून कोणताच पक्ष युवकांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जायची आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो त्यांना युवकांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील, तसेच त्यांच्यासाठी काम करावे लागेल. हेच आमचे धोरण आहे.

संपादकीय भूमिका

देहली आंदोलनात स्वतःच्या व्यासपिठावर हिंदूंच्या देवतांची टिंगल करणारा  करणारा कुणाल कामरा, कलम ३७० पुन्हा लागू करण्याची राष्ट्रघातकी मागणी करणारे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी, हिंदुद्वेषी विधान करणारे अभिनेते प्रकाश राज अशा लोकांना स्थान देणार्‍या ‘कॉकरोच जनता पक्षा’कडून युवकांमध्ये कसली जागृती होणार ?