उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

अल्पवयीन हिंदु मुलींच्या छेडछाडीचा हिंदूंनी विरोध केल्यामुळे झाले आक्रमण !

उमरेठ (गुजरात) – येथे ४ जूनच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी चंद्रमुलेश्‍वर महादेव मंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. काही धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलींची छेड काढल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नये आणि झाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते पुन्हा धाडस करू शकणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते !

पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यास नकार !

२ अल्पवयीन हिंदु मुली दुचाकीवरून जात होत्या. त्यातील एकीला तिच्या घराजवळ सोडले असता २ धर्मांध मुसलमानांनी तिची छेड काढून तिचा हात धरला. तिने आरडाओरड केल्यावर स्थानिक नागरिक धावत आले. ते पाहून धर्मांध मुसलमान पळून गेले. या घटनेची तक्रार करण्यास मुली आणि त्यांचे पालक पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पालकांचा आरोप होता की, पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत.

त्याच रात्री हिर पटेल आणि त्यांचा मित्र स्टेशन मार्गावरून जात असतांना छेडछाडीच्या घटनेची चर्चा करत होते. ही चर्चा तेथे उपस्थित धर्मांध मुसलमानांनी ऐकली आणि त्यांनी या दोघांशी वाद घातला. त्यानंतर धर्मांध मुसलमान तलवारी आणि काठ्या घेऊन आले अन् त्यांनी शिवमंदिरावर आक्रमण केले. त्या वेळी येथील रस्त्यावरील दिवे अचानक बंद करण्यात आले. (अशा पोलिसांवर गुन्हा नोंद करून त्यांना नोकरीतून काढून टाकले, तरच इतरांवर वचक बसेल ! – संपादक)

हिंदूंनाही अटक केल्याने पोलीस ठाण्याला घेराव !

या घटनेवरून पोलिसांनी ८ जणांना अटक केली. यात हिंदु तरुणांचाही समावेश आहे. या तरुणांना अटक केल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसचे पोलीस उपनिरीक्षकाने खोटी तक्रार नोंदवून घेतल्याचा आरोप केला. (याला म्हणतात ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ ! हे हिंदूंना अपेक्षित नाही, हेच त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दर्शवले आहे ! याकडे सरकारने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)