पोलिसांकडून महिला हवालदाराचीच तक्रार घेण्यास टाळाटाळ !

जैताने (जिल्हा धुळे) – येथील निजामपूर भागात एक महिला हवालदार वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी जात असतांना एका धर्मांधाने तिच्या अंगावर खराब पाणी फेकले आणि वरून अरेरावी केली. (उद्दाम धर्मांध ! – संपादक)
विशेष म्हणजे स्वतः महिला हवालदार असूनही या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर तेथील उपसरपंच आणि गोरक्षक पिंटूभाऊ पगारे अन् शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी पोलिसांना तक्रार घेण्यास भाग पाडले. ‘पोलिसांनी शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा’, अशी मागणी सतीलाल महाराज देवरे आणि साक्री तालुक्यातील ‘सकल हिंदु समाज यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकामहिला पोलिसांचीही तक्रार न घेणारे पोलीस सर्वसामान्य हिंदु महिलांची तक्रार कधी घेतील का ? अशांना तात्काळ बडतर्फ करा ! |
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !