
नवी देहली – देशात घटस्फोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे प्रेमविवाह हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. घटस्फोटाच्या एका प्रकरणाच्या संदर्भात १७ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.आर्. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपिठासमोर वैवाहिक वादाशी संबंधित प्रकरण वर्ग करण्याच्या सूत्रावर सुनावणी होत असतांना संबंधित प्रकरण हे प्रेमविवाहाच्या संदर्भात असल्याने न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, घटस्फोटाची अनेक प्रकरणे प्रेमविवाहामुळे झाल्याचे समोर आले आहे.
Supreme Court notes divorces often stem from love marriages during hearing on transfer petition in matrimonial dispute.#feedmile #arrangemarriage #Supremecourt #lovemarriage #marriage #lovecouples #couples #lifepartners #marriedlife #marrying #newlyweds #love #wedding #bride pic.twitter.com/03e0Nq1Tan
— Feedmile (@feedmileapp) May 18, 2023
१. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेत पती-पत्नीला मध्यस्थी करून वाद संपवण्यास सांगितले; मात्र पती-पत्नी दोघांनीही यासाठी नकार दिला. या वेळी न्यायाधिशांनी म्हटले की, विवाह म्हणजे समाधान आणि नि:स्वार्थ प्रेम असे नाते असते.
२. न्यायालयाने पुढे म्हटले की, घटस्फोट देतांना सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. यामध्ये ‘पती-पत्नी दोघेही शेवटचे एकमेकांच्या सहवासात केव्हा आले होते ?’, ‘स्वत:च्या जोडीदाराविषयी आणि एकमेकांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी काय आरोप केले आहेत ?’ आदी सर्व पहावे लागते.
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !