
समलैंगिक संबंध हे हिंदु धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाप आहे. आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही. आपल्याकडे लैंगिक संबंध विशेषतः संभोग हा केवळ प्रजोत्पत्ती या एकमेव उद्देशाने केला जातो. समलैंगिक संबंधात प्रजोत्पत्ती हा उद्देश नाही, तेथे केवळ भोगवाद आहे. आपली संस्कृती भोगवादाचे समर्थन करत नाही. न्यायदेवतेने जो काही निर्णय दिला आहे, तो आजच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून जरी असला, तरी ‘पाप केल्याने मृत्यूनंतर जीव दुर्गतीला जातो’, हे धर्मश्रद्ध समाजाने लक्षात घेतले पाहिजे. – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था. (७.९.२०१८)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?