हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

श्री. सुरेश चव्हाणके

भारताची मुख्य सुरक्षायंत्रणा असलेल्या राजधानी देहलीतील जहांगीरपुरी येथे दंगल होते, हे लज्जास्पद आहे. हे सर्व अचानक झाले नसून सर्व पूर्वनियोजित होते, असे आता समोर येत आहे; मात्र अशा दंगली काही नवीन नसून नेहमीच विविध दंगलीत हिंदूंवर दगडफेक आणि आक्रमण करणारे धर्मांध असतात. हे जगभर चालू आहे. या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ (धर्मांधांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवण्यासाठी केलेली कार्यप्रणाली) हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल. या टोळीचा पराभव करण्यासाठी हिंदूंनी स्वत:ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.