
चिपळूण – मार्च मासाच्या शेवटपर्यंत जे थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम नगरपालिकेकडे भरणार नाहीत, त्यांची नावे चिपळूण शहरात लावण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ही कारवाई ७ मार्चपासून केली जाणार असून तशी नोटीस संबंधितांना पाठवण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष संपत असल्याने नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग आणखी वाढवला आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या अनेकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून १०५ जणांची नळजोडणी तोडण्यात आली आहेत. त्यातील २७ जणांनी कर भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जे नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांची नळजोडणी तोडली जात आहे. पाणीपट्टीतून नगरपालिकेला २ कोटी ५० लाख रुपये मिळणे अपेक्षित असून त्यातील केवळ ९७ लाख रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे नळजोडणी तोडण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !