६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !
नवी देहली – आयकर विभागाकडून चालू असलेले बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांतील सर्वेक्षण ६० घंट्यांनंतर संपले आहे. या संदर्भात बीबीसीच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आयकर विभागाच्या अधिकार्यांनी देहली आणि मुंबई येथील आमची कार्यालये सोडली आहेत. आम्ही आयकर विभागाला सहकार्य करत राहू. लवकरच हे प्रकरण निकाली निघेल, अशी आशा आहे. आमचे वाचक, श्रोते आणि दर्शक यांना निष्पक्षपाती बातम्या देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही एक विश्वासार्ह, निष्पक्ष, आंतरराष्ट्रीय आणि स्वतंत्र माध्यम आहोत. (यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक) आम्ही आमचे सहकारी आणि पत्रकार यांच्या पाठीशी उभे आहोत जे कोणतीही भीती किंवा लोभ न बाळगता बातम्या देत रहातील.
करीब 60 घंटे तक चली आयकर विभाग की कार्रवाई #crime| @MunishPandeyy https://t.co/o48e8PUMUK
— AajTak (@aajtak) February 16, 2023
संपादकीय भूमिकाबीबीसीकडून निष्पक्षपणे बातम्या देण्याच्या दाव्यावर कोणताही धर्माभिमानी हिंदु आणि राष्ट्रप्रेमी नागरिक विश्वास ठेवू शकणार नाही, इतके ते सत्य आहे ! |

मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !