
कोल्हापूर – मिरज-पुणे मार्गावर कोरेगाव ते सातारा या दरम्यान दुहेरीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-सातारा या दोन पॅसेंजर रेल्वे २ मार्चपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या गाड्या रहित झाल्याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, तसेच कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस याच गाड्या उपलब्ध आहेत. याचसमवेत कोल्हापूर-हरिप्रिया ही रेल्वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्कळ हाल होणार आहेत. तरी अनेक प्रवासी संघटनांनी या पॅसेंजर गाड्या किमान मिरज किंवा कराड येथपर्यंत सोडाव्यात, अशी मागणी केली आहे.
मिरज-लोंढा मार्गावरील पॅसेंजर गाड्याही १३ फेब्रुवारीपर्यंत रहित !
मिरज-लोंढा मार्गावर घटप्रभा, गोकाक रोडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मिरज-हुबळी, मिरज-कॅसरलॉक पॅसेंजर रेल्वे १३ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत. याचसमवेत अजमेर-म्हैसूर, बेंगळुरू-अजमेर, जोधपूर-बेंगळुरू, निजामुद्दीन-म्हैसूर, गांधीधाम-बेंगळुरू या रेल्वे गाड्या मिरजेतून पंढरपूर, सोलापूर, होटगीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. एर्नाकुलम्-पुणे एक्सप्रेस ६ फेब्रुवारीला पनवेलमार्गे पुण्याच्या दिशेने धावेल. ही गाडी मिरज येथून जाणार नाही. हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्णजयंती एक्सप्रेस ६ फेब्रुवारीला दौंड, सोलापूर, होटगी, गदगमार्गे धावेल. ही गाडी पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज येथे येणार नाही. याशिवाय अन्य गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !