हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मूळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) केला जात आहे. परिणामी रेल्वे, संरक्षणदल यांच्या नंतर देशभरात ८ लाख एकरपेक्षा अधिक भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाली आहे. काँग्रेसने मुसलमानांना दिलेली शक्ती वा हा कायदेशीर अधिकार हिंदु, ख्रिस्ती वा अन्य कोणत्याही पंथाकडे नाही. या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन या कायद्याच्या मूळावरच घाव घातला पाहिजे आणि हा कायदा पालटण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे.