बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे देशाची अपकीर्ती करणारे संतापजनक विधान !

पाटलीपुत्र (बिहार) – भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
‘भारत में मुस्लिम असुरक्षित हैं, बच्चों को वापस नहीं आने को बोल दिया है’… RJD नेता Abdul Bari Siddiqui के विवादित बोलhttps://t.co/kdcOueqQmC
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) December 23, 2022
१. अब्दुल बारी सिद्दीकी म्हणाले की, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सध्या अमेरिकेतील हॉवर्ड विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. मुलगी ‘लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स’मधून उत्तीर्ण झाली आहे. देशातील वातावरण पहाता मी माझ्या मुलांना सांगितले आहे की, तिकडेच नोकरी करा. तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळाले, तर घेऊन टाका. भारताची सद्य:स्थिती पहाता तुम्हाला येथील परिस्थितीशी जुळवून घेता येणार नाही.
२. सिद्दीकी यांच्या या विधानावर बिहारमधील भाजपचे प्रवक्तेे निखिल आनंद यांनी टीका करतांना म्हटले की, सिद्दीकी यांच्यासारखी लोक स्वत:ला उदारमतवादी म्हणवतात; मात्र त्यांची विचारसरणी ही मदरशांमधील लोकांसारखी आहे. ते आपल्याच देशाच्या विरोधात गरळ ओकत आहेत.
संपादकीय भूमिका
|
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !