जांब (जिल्हा जालना) येथील श्री राम पंचायतन मूर्ती चोरीचे प्रकरण

यवतमाळ येथे ब्राह्मण संघटनांकडून निषेध निवेदन !

श्रीराम मंदिर, जांब समर्थ (जिल्हा जालना)

यवतमाळ, १ सप्टेंबर (वार्ता.) – श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या नित्यपूजेतील श्रीराम पंचायतनासह ७ मूर्ती, समर्थांचे जन्मगाव जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून चोरील्या गेल्या आहेत. आठवडा उलटून गेला, तरी त्यावर पोलीस प्रशासनाने अद्याप चोरांचा शोध घेतलेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना विविध ब्राह्मण संघटनांकडून निषेध निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना श्री समर्थ उपासक मंडळ, श्री रामनाम उपासना मंडळ, आध्यात्मिक मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, समर्थ ब्राह्मण मंडळ, युवा ब्राह्मण संघ, हिंदु जनजागृती समिती यांचे पदाधिकारी, तसेच नगरसेवक प्रा. डॉ. अमोल देशमुख कापसे हे उपस्थित होते.