अभिनेते आमीर खान यांच्या जवळच्या व्यक्तीची माहिती

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान यांनी ४ वर्षांनी ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून पुनरागमन केले. ११ ऑगस्ट या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला; पण प्रेक्षकांनी या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात बहिष्कार घातला. चित्रपट अयशस्वी ठरल्याने आमीर खान निराश झाले आहेत, अशी माहिती आमीर खान आणि त्यांची पहिली पत्नी किरण राव यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. ‘चित्रपटाच्या अपयशामुळे आमीर यांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले होते. आता या अपयशाचे दायित्व त्यांनी स्वतः घेतले असून चित्रपट वितरकांना ते स्वतः हानीभरपाई देणार आहेत.’’
या चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली, तर दुसर्या दिवशी केवळ ७ कोटी ५० लाख रुपये इतकीच कमाई होऊ शकली. काही ठिकाणी तर प्रेक्षकांअभावी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे खेळ रहित करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !