मुंबई – राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केला आहे. या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय पालटू शकतात ?’, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने ९ प्रभाग वाढवून मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना केली होती. तसेच आरक्षण सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर नवनियुक्त सरकारकडून निवडणूक घोषित होणे अपेक्षित होते; मात्र या सरकारने २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे मत आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केल्याप्रकरणी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार !
महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केल्याप्रकरणी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार !
नूतन लेख
- श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !
- मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !
- पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
- पुणे येथील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’कडून ‘आर्.टी.ई.’तील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा आरोप !
- नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !
- महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !