
१. युवा साधकांच्या मनात साधना करण्याचा उत्साह निर्माण करणारा सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेला चैतन्यमयी सत्संग !

१ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांचे बोलणे साधकांच्या अंतर्मनापर्यंत जात असणे आणि त्यांना व्यष्टी अन् समष्टी साधना करण्यासाठी चैतन्य मिळणे : ‘सद्गुरु स्वाती खाडये प्रत्येक आठवड्याला युवा साधकांसाठी सत्संग घेतात. त्या सत्संगात युवा साधकांकडून आठवड्यात झालेले साधनेचे प्रयत्न जाणून घेतात. त्या ‘पुढील आठवड्यात कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी युवा साधकांना दिशा देतात. त्या ‘साधकांनी आणखी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे ?’, हेही सांगतात. त्यांचे बोलणे ऐकून साधकांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. त्यांचे बोलणे साधकांच्या अंतर्मनापर्यंत जाते आणि त्यातून त्यांना आठवडाभर प्रयत्न करण्यासाठी चैतन्य मिळते. त्यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक युवा साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत वृद्धी झाल्याचे लक्षात आले.
१ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्यातील तळमळीमुळे युवा साधकांचे प्रयत्न चांगले होत असणे : गुरुकृपेने मलाही त्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. सद्गुरु स्वातीताई सांगत असलेली साधनेची सूत्रे सध्याच्या काळात पुष्कळ आवश्यक आहेत. त्या पुष्कळ तळमळीने सूत्रे सांगतात. त्यामुळे साधकांच्या मनात ते प्रयत्न करण्याविषयी आपोआप उत्साह निर्माण होतो. सद्गुरु ताईंच्या चैतन्यमय वाणीतून युवा साधकांना मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांचे प्रयत्न चांगले होत आहेत.
२. साधकांना सद्गुरु स्वातीताईंचे पुष्कळ साहाय्य होणे आणि त्यांचा आधार वाटणे
सद्गुरु ताई अनेक वेळा ठिकठिकाणच्या साधकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रत्येक मार्गदर्शनानंतर ‘साधकांच्या प्रयत्नांमध्ये वृद्धी होते’, असे लक्षात आले. त्या ‘साधकांच्या साधनेसाठी काय आवश्यक आहे ?’, हे जाणतात आणि त्यानुसार त्या साधकांना मार्गदर्शन करतात. त्यांचे साधकांना पुष्कळ साहाय्य होते आणि त्यांचा आधार वाटतो.
असे समष्टी सद्गुरु घडवणारे विष्णुस्वरूप गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. ज्ञानदीप चोरमले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १९ वर्षे), सोलापूर (२५.१२.२०२१)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !