
‘आश्रमात येतांना माझ्या मनात विचार होता, ‘अंतिम संकलक बनायचे ध्येय ठेवूया.’ आश्रमात आल्यावर विचार आला, ‘आधी चांगला साधक बनायला पाहिजे. चांगला साधक बनल्यावर अंतिम संकलक इत्यादी काहीही बनू शकतो.’ या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘चांगला साधक असला की, कोणतीही सेवा दिली, तरी काही फरक पडत नाही.’’
नकारात्मक किंवा भूतकाळातील विचार करण्यापेक्षा सकारात्मक राहून तळमळीने साधना करावी !
‘पूर्वी माझ्या मनात ‘मी २२ ते २४ वर्षे साधना करत आहे. पुष्कळ काळ गेला, तरी मी साधनेत पुढे जात नाही’, असे विचार यायचे. आता मनातील सकारात्मक विचार वाढले असून माझ्या मनात ‘यापुढे जेवढी अधिक तळमळीने आणि उत्साहाने साधना करता येईल, तेवढी केली पाहिजे. पूर्वीच्या काळी कितीतरी जन्म साधना करावी लागायची’, असे विचार येतात. त्या विचारांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘मागचा विचार करायला नको. आता काय करता येईल, तेच पहायला पाहिजे. नाहीतर काही जण निराशेत जातात. सकारात्मक विचार करणे चांगले असते.’’
– सौ. कविता बेलसरे, पुणे
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !