
‘२४ जुलै ते २८ जुलै या कालावधीत (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंचे मृत्यूत्तर विधी आश्रमात चालू होते. तेव्हा मृत्यूत्तर विधींच्या ठिकाणी (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंचे छायाचित्र ठेवले होते. ते पाहिल्यावर मला त्यातून पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाल्याचे जाणवले. तेव्हा मला (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंच्या लिंगदेहाचे दर्शन झाले. हा लिंगदेह पिवळसर रंगाचा असून ‘तो जनलोकात आत्मानंद अनुभवत आहे’, असे मला जाणवले. (कै.) सौ. मराठेकाकूंच्या मृत्यूत्तर विधीच्या वेळचे वातावरण दु:खी किंवा उदासवाणे न वाटता ‘एका संतांचा सोहळा आहे’, असे मला जाणवत होते. यावरून असे लक्षात आले की, ‘(कै.) सौ. मराठेकाकू संत झाल्या आहेत आणि त्यांच्या लिंगदेहाला शिवात्म्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून तो जनलोकात आनंदात आहे.’ त्यामुळे खरेतर त्यांच्यासाठी मृत्यूत्तर विधी करण्याची आवश्यकता नाही; परंतु सामाजिकदृष्ट्या विचार करून त्यांच्यासाठी धार्मिक विधी केले जात आहेत. त्यामुळे हे विधी करणारे (कै.) सौ. मराठेकाकूंचे यजमान श्री. प्रकाश मराठे यांना संतांसाठी हे विधी केल्यामुळे पुण्यफळ मिळून त्यांची समष्टी साधना होत आहे. त्याचप्रमाणे या धार्मिक विधींतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ सनातनच्या ६० हून अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या काही दिवंगत झालेल्या आणि मृत्यूत्तर सद्गती न मिळालेल्या साधकांच्या लिंगदेहांना होऊन त्यांना पुढे सद्गती मिळणार आहे. अशा प्रकारे संतपद प्राप्त केलेल्या दिवंगत साधकांसाठी केलेल्या मृत्यूत्तर विधींचा लाभ समष्टी स्तरावर म्हणजे दिवंगत झालेल्या अन्य साधकांच्या लिंगदेहांना सद्गती देण्यासाठी होतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिवंगत झालेल्या संतांचे मृत्यूत्तर विधी करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना सांगतात. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी, व्यापकता आणि समष्टीसाठीचा कल्याणकारी भाव दिसून येतो.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२२)
|
पूर्वी एका कुटुंबासारखा एकत्रित असलेला समाज, आणि आजचा हा तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !