
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – राष्ट्रीय स्मारक असलेल्या हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळावरील प्रवेशद्वाराची भिंत २७ जून या दिवशी पावसाने कोसळली, तसेच उर्वरित प्रवेशद्वार केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. २ वर्षांपूर्वी प्रवेशद्वाराच्या भिंतीचा काही भाग पडला होता. त्या वेळी या भिंतीची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र पुरातत्व विभाग आणि नगर परिषद यांनी याकडे दुर्लक्ष केले. (अशी मागणी का करावी लागते ? तसेच केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष का करण्यात येते ? यासाठी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक) राजगुरु यांच्या जन्मस्थळाला पर्यटक, अभ्यासक, शालेय विद्यार्थी, नागरिक यांची नेहमी गर्दी असते. या भिंतीची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी ‘हुतात्मा राजगुरु समिती’चे अध्यक्ष अतुल देशमुख, विठ्ठल पाचारणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
राजगुरूंचे जन्मस्थळ असलेल्या ‘थोरला वाड्या’चे बांधकाम पुरातत्व खात्याने पूर्ण केले. मात्र वाड्यात हुतात्मा राजगुरूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारणे, जीवनकार्याची माहिती देणारा लघुपट दाखवणे, पुतळे आणि शिल्पे उभारणे, संग्रहालय उभारणे आदी अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. निधीअभावी सर्व कामे रखडली असून यातून प्रशासकीय अनास्था अधोरेखित होते.
संपादकीय भूमिका
|
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध : रासायनिक लेपनामुळे मूर्तीची हानी !
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !