कर्नाटकातील भाजप सरकारचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचा दावा

बेळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उत्तरप्रदेश राज्याचे ५, महाराष्ट्राचे २ आणि कर्नाटक राज्याचे २ तुकडे करून नवीन राज्ये निर्माण करण्याची भाजपची योजना आहे, असा दावा कर्नाटकातील भाजप सरकारचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केले. ‘देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने करता यावा, यासाठी ५० नवीन राज्ये निर्माण करायची अशी मोदी यांची योजना आहे’, असेही कत्ती यांनी सांगितले. ‘बेळगाव बार असोशिएशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
#Karnataka minister Umesh Katti said that once PM Narendra Modi returns to power after winning the 2024 Assembly polls, the state would be split into two and Uttara (North) Karnataka would become a separate state.https://t.co/guqWqCn5Un
— IndiaToday (@IndiaToday) June 23, 2022
उमेश कत्ती पुढे म्हणाले की, उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच दक्षिणेकडील राज्यांवरही स्वतःचा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी तेथील राज्यांचे विभाजन केले पाहिजे, अशी भाजपच्या नेत्यांची पूर्वीपासूनचीच मागणी आहे. कर्नाटकचा भूभाग मोठा असून कर्नाटकच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांचा कर्नाटकच्या राजकारणावर अधिक प्रभाव आहे. हाच अभ्यास करून भाजपने कर्नाटकच्या विभाजनाची योजना बनवली आहे. कर्नाटकातील ‘उत्तर कन्नड’ हे स्वतंत्र राज्य निर्माण केले जाणार आहे.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !