अग्नीपथ योजनेच्या विरोधात चालू असलेल्या गदारोळाचे प्रकरण

बेंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या कर्नाटक राज्याच्या दौर्यावर असतांना एका कार्यक्रमात ‘अग्नीपथ’ या सैन्यभरतीच्या योजनेच्या विरोधात चालू असलेल्या गदारोळाचा नामोल्लेख न करता वक्तव्य केले. पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’
पंतप्रधान पुढे म्हणाले की, नवीन उद्योगधंदे आणि नुतनीकरण (इनोव्हेशन) यांसाठी गेली ८ वर्षे केले गेलेले प्रयत्नही सोपे नव्हते. सुधारणांमुळे आपल्याला नवीन उद्दिष्टे आणि संकल्प यांच्याकडे मार्गक्रमण करता येते. या वेळी त्यांनी अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रांचा उल्लेख केला. ‘हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, चांगल्या हेतूंनी आणलेल्या अनेक चांगल्या योजना राजकीय रंगांमध्ये अडकतात. प्रसारमाध्यमेही यामध्ये ओढली जातात’, अशी खंतही मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी