‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

१. मनुष्य
जेव्हा मनुष्याच्या जीवनात सुख येते, तेव्हा तो त्याचे कर्तेपण स्वतःकडे घेतो. जेव्हा त्याच्या जीवनात दुःख येते, तेव्हा त्याविषयी तो भगवंताला दोष देतो. तो म्हणतो, ‘भगवंताने असे का केले ?’
२. साधक

जेव्हा साधकाच्या जीवनात सुखाचे क्षण येतात, तेव्हा तो ‘सर्वकाही ईश्वरी कृपेने किंवा गुरुकृपेनेच झाले’, असे म्हणतो. जीवनात दुःखाचे प्रसंग आल्यावर ‘हे माझ्या प्रारब्धामुळे झाले’, असे साधकाला वाटते. साधक सुख-दुःख यांवर मात करण्याचे प्रयत्न करत असल्यामुळे ते कठीण प्रसंगात निराश न होता त्यातून बाहेर येतात.
३. शिष्य
‘जीवनात येणारे सुख-दुःख म्हणजे गुरुकृपा आहे’, असे शिष्याला वाटते. ‘जेव्हा जीवनात सुख असेल, तेव्हा आपले पुण्य संपत आहे आणि विपरीत घडत असेल, तर पाप नष्ट होत आहे’, असे शिष्याला वाटते. तो सुख-दुःखाच्या पलीकडे, म्हणजे आनंदावस्थेकडे जातो.
निराशा आणि दुःख याऐवजी ‘पाप नष्ट होत आहे’, या विचाराने शिष्यांना कृतज्ञता वाटते.
सद्गुरु पिंगळेकाकांनी वरीलप्रमाणे दिलेल्या दृष्टीकोनामुळे ‘शिष्य बनण्यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, याविषयी साधकांना शिकायला मिळाले.
– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (२३.९.२०२१)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !