इयत्ता बारावीच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर !

मुंबई विभागाचा निकाल सर्वांत अल्प

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नुकताच घोषित झाला. राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे. सर्वांत अल्प निकाल मुंबई विभागाचा म्हणजेच ९०.९१ टक्के इतका लागला आहे. निकालात मुली आघाडीवर असून विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के, तर विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ टक्के इतका लागला आहे.