बांगलादेशातील शरणार्थी तळावर चांगली सुविधा मिळत असल्याने घुसखोरी !

ढाका (बांगलादेश) – भारतातून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात घुसखोरी करत असल्यावरून बांगलादेश सरकारने भारताकडे चिंता व्यक्त करत ती रोखण्यास सांगितले आहे. या संदर्भात बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले आहे. बांगलादेशचे म्हणणे आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशमध्ये घुसखोरी करत आहेत.
बांग्लादेश सरकार ने भारत से हो रही रोहिंग्या मुसलमानों की घुसपैठ को लेकर चिंता जताई है https://t.co/QlquvorzHb
— AajTak (@aajtak) May 25, 2022
१. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले होते की, भारतातून बांगलादेशात घुसखोरी करणारे रोहिंग्या मुसलमान वर्ष २०१२ मध्ये भारतात घुसले होते. भारतातून मोठ्या संख्येने रोहिंग्या मुसलमान आमच्या देशात येत आहेत. त्यासाठी ते दलालांचे साहाय्य घेत आहेत. ज्या रोहिंग्यांनी बांगलादेशात घुसखोरी केली, त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील रोहिंग्यांना शरणार्थी तळावर चांगल्या सुविधा आणि भोजन मिळत आहे. त्यामुळे ते येथे येत आहेत.
२. भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी १६ सहस्र रोहिंग्या शरणार्थी आहेत. ही संख्या अधिकही असू शकते, असे म्हटले जाते. बांगलादेशात ११ लाख रोहिंग्या आहेत.
संपादकीय भूमिका
|
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !