बांगलादेशातील शरणार्थी तळावर चांगली सुविधा मिळत असल्याने घुसखोरी !

ढाका (बांगलादेश) – भारतातून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात घुसखोरी करत असल्यावरून बांगलादेश सरकारने भारताकडे चिंता व्यक्त करत ती रोखण्यास सांगितले आहे. या संदर्भात बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले आहे. बांगलादेशचे म्हणणे आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशमध्ये घुसखोरी करत आहेत.
बांग्लादेश सरकार ने भारत से हो रही रोहिंग्या मुसलमानों की घुसपैठ को लेकर चिंता जताई है https://t.co/QlquvorzHb
— AajTak (@aajtak) May 25, 2022
१. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले होते की, भारतातून बांगलादेशात घुसखोरी करणारे रोहिंग्या मुसलमान वर्ष २०१२ मध्ये भारतात घुसले होते. भारतातून मोठ्या संख्येने रोहिंग्या मुसलमान आमच्या देशात येत आहेत. त्यासाठी ते दलालांचे साहाय्य घेत आहेत. ज्या रोहिंग्यांनी बांगलादेशात घुसखोरी केली, त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील रोहिंग्यांना शरणार्थी तळावर चांगल्या सुविधा आणि भोजन मिळत आहे. त्यामुळे ते येथे येत आहेत.
२. भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी १६ सहस्र रोहिंग्या शरणार्थी आहेत. ही संख्या अधिकही असू शकते, असे म्हटले जाते. बांगलादेशात ११ लाख रोहिंग्या आहेत.
संपादकीय भूमिका
|
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation