राजस्थान सरकारने खासगी वाहनांना केला टोल माफ !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – यापुढे महामार्गांवरून प्रवास करतांना खासगी वाहनांना ‘टोल’ भरावा लागणार नाही, अशी घोषणा राजस्थान सरकारने केली आहे. व्यावसायिक वाहनांवरील टोलवसुली मात्र कायम रहाणार आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाणार का, हा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.