बंगालमध्ये हिंदु मुलींवरील नृशंस बलात्कार म्हणजे बंगालची दुसऱ्या काश्मीरकडे होणारी वाटचाल !

‘बंगालमध्ये एकेका हिंदु मुलीवर तृणमूल काँग्रेसचे १००-१०० कार्यकर्ते बलात्कार करत आहेत. याकडे देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी त्वरित लक्ष द्यायला हवे, तसेच या प्रकरणांची चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी. यासंदर्भात प्राची अधिकारी या मानवाधिकार कार्यकर्तीने ‘यू ट्यूब’वर एका चित्रफितीद्वारे मांडलेले वास्तव येथे देत आहोत.

१. हिंदु मुलींवर ५० ते २०० माणसांनी रात्रभर बलात्कार करणे आणि सकाळी त्यांना त्यांच्या घराच्या समोरील झाडीत फेकून देणे

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रात्री ७ वाजता हिंदु मुलींना गाडीमध्ये उचलून घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्यावर ५० ते २०० माणसे बलात्कार करतात. या मुलींशी अनैसर्गिक संबंधही निर्माण केले जातात. त्यांच्यासमवेत वाईटातील वाईट अत्याचार केले जातात. सकाळी त्या मुलींना त्यांच्या घरांच्या समोरील झाडींमध्ये फेकून दिले जाते. हिंदु मुलींचे आई-वडील किंवा कुटुंबीय त्यांच्या घरासमोर चादर ठेवून द्यायचे. जर त्या मुलीमध्ये बळ राहिले असेल, तर ती अंगावर चादर पांघरून घेते आणि बळ नसले, तर पीडित हिंदु आई-वडीलच मुलीच्या अंगावर चादर पांघरून कसे तरी घराच्या आत घेऊन जायचे. एवढेच नाही, तर तृणमूलचे कार्यकर्ते त्या मुलीला सोडून देतात आणि तिची बहीण किंवा शेजारी रहाणाऱ्या दुसऱ्या हिंदु मुलीला घेऊन जातात. कार्यकर्ते विशेषत: हिंदु मुली आणि महिला यांनाच लक्ष्य करत असल्याचे दिसते.

२. पीडित मुलींना वाचवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांमुळे बंगालचे वास्तव समोर येणे

२ अ. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार केल्यास ते आई-वडिलांना मारून टाकण्याची शक्यता असल्याने हिंदु मुली तसे करण्यास न धजावणे : एका मानवाधिकार कार्यकर्तीने अशा दोन मुलींना वाचवले आहे. त्यामधून हे वास्तव समोर आले आहे. एका आठवड्यानंतर एका मुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. तिने सांगितले, ‘‘आम्हाला विषाची गोळी द्या, म्हणजे आम्ही मरून जातो; परंतु आता परत आम्हाला त्या भागात सोडू नका !’’ मानवाधिकार कार्यकर्तीने त्या मुलींना विचारले, ‘‘तुम्ही पोलिसांकडे तक्रार का करत नाहीत ?’’ यावर तिने सांगितले, ‘‘आम्ही असे करू शकत नाही; कारण हे सर्व तेथील तृणमूल नेत्यांच्या संगनमताने होत असते. आम्ही तक्रार केल्यास तृणमूलचे नेते आमच्या आई-वडिलांना मारून टाकतील. काही मुलींच्या आई-वडिलांनी हे भोगलेले आहे. आमचा व्यवसाय आधीच नष्ट करण्यात आला आहे.’’

२ आ. दोन वेळचे जेवण आणि अंगभर कपडे इतकीच अपेक्षा असल्याचे हिंदु मुलीने सांगणे : त्या मानवाधिकार कार्यकर्तीने सांगितले, ‘‘आम्ही पक्षाच्या संघटनेशी बोलू का ?’’ त्यावर हिंदु मुलीने सांगितले, ‘‘आमच्याकडून आधीच मोठी चूक झाली आहे. आता आम्हाला कोणत्याही पक्षाच्या भानगडीत पडायचे नाही. केवळ आम्हाला दुसरीकडे हलवा. दोन वेळचे जेवण आणि अंगभर घालायला कपडे मिळतील, एवढीच अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काही नको.’’ हिंदु महिला म्हणाल्या, ‘‘आम्हाला आता चांगला मृत्यू आला, तरी पुष्कळ झाले.’’

 ३. वर्ष १९७१ च्या काळातील बांगलादेशमधील हिंदु मुलींचे भयाण वास्तव !

हे सर्व ऐकल्यावर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. वर्ष १९७१ च्या काळात बांगलादेशमध्ये एका हिंदु मुलीवर १०-१० पाकिस्तानी सैनिक बलात्कार करायचे. हिंदु मुलीची आई त्यांना हात जोडून विनवणी करायची, ‘कमीत कमी एवढे तरी उपकार करा की, एकेकट्याने बलात्कार करा.’

४. काही हिंदूंनी तृणमूल काँग्रेसला मतदान केल्यामुळे हिंदूंनाच नरकयातना सोसाव्या लागणे

वर्ष २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये ४४ टक्के मतदान झाले. त्यात ३० टक्के मतदान मुसलमानांचे होते आणि इतर १४ टक्के मते हिंदूंची होती. या १४ टक्के लोभी हिंदूंमुळे आज बंगालच्या ९० टक्के हिंदूंना नरकमय यातना सहन कराव्या लागत आहेत. यात ज्या हिंदूंनी संघटितपणे विरोध केला नाही, त्यांचाही तितकाच दोष आहे.

५. भारताला इस्लामी होण्यापासून वाचवायला हवे !

‘जे बांधकाम व्यावसायिक किंवा सामान्य हिंदू आहेत, जे पैशांच्या लोभापायी धर्मांधांना घरे किंवा भूमी विकतात, त्यांनी कृपया ही चूक करू नये. असे व्यवहार करतांना मूळ कागदपत्रे पडताळावीत; कारण लोभामुळे भविष्यात सनातन धर्म नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. या राष्ट्राला इस्लामी होण्यापासून वाचवा’, असे आवाहन आज करायला हवे.

६. बलात्कार प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून तृणमूलच्या गुन्हेगारांना फासावर लटकवा !

ममता बॅनर्जी या जिहादींच्या कठपुतली मुख्यमंत्री आहेत किंवा त्या स्वत:च एक जिहादीन आहेत. सरकार आणि सर्वाेच्च न्यायालय यांना माझे निवेदन आहे की, त्यांनी लवकरात लवकर या चित्रफितीच्या आधारे अन्वेषण करून या प्रकरणाचे खोलवर अन्वेषण करावे आणि तृणमूलचे गुन्हेगार कार्यकर्ते अन् नेते यांना फासावर लटकवावे !

– प्राची अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्त्या