राणा यांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवला ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राणा पती-पत्नी

मुंबई – पोलीस अभ्यास करूनच गुन्हा नोंदवतात. राणा यांच्यावर नोंदवलेला राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवण्यात आला, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ६ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केले. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देतांना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.