जनतेचे पैसे वापरून जनतेलाच आमीष दाखवणारे सर्व राजकीय पक्ष !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यानंतर यातील काही सुविधांची पूर्तता ते जनतेचा पैसा वापरूनच करतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले