मुंबई – गेल्या ३ मासांपासून एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील ८ दिवसांपासून मुंबईत एस्.टी. कर्मचार्यांच्या बैठका चालू आहेत. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील प्रत्येक आगारातील २ एस्.टी. कर्मचारी आले होते. या बैठकीत सरकारसमवेत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कर्मचार्यांनी सिद्धता केली आहे. या बैठकीत कर्मचार्यांकडून संप मिटावा यासाठी सरकारसमोर काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार हमी सरकारने द्यावी, सर्व कर्मचार्यांवरील कारवाया मागे घ्याव्यात यासमवेत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रहित करण्यात यावी आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे.
एस्.टी. कर्मचारी चर्चा करण्यास सिद्ध !
नूतन लेख
- गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
- दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
- सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !
- थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !
- स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या ज्ञानेश महारावांसह आयोजकांवर गुन्हे नोंदवा !
- Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस