(म्हणे) ‘पाकिस्तान नाही, तर चीन भारताचा खरा शत्रू !’  

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे पाकची बाजू घेणारे विधान !

  • पाक असो कि चीन दोघेही भारताचे शत्रू आहेत; मात्र मुसलमानांच्या मतांसाठी समाजवादी पक्ष पाककडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होते ! असा पक्ष सत्तेत आल्यास त्याने पाकच्या घुसखोरांना पायघड्या घातल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक
  • निवळ स्वार्थासाठी पाकच्या भारतविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करणार्‍या समाजवादी पक्षाला निवडणुकीत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मतपेटीद्वारे त्याची जागा दाखवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, तर चीन आहे. भाजप मात्र सातत्याने पाकला लक्ष्य करतो. समाजवादी डॉ. राम मनोहर लोहिया आणि मुलायम सिंह यादव यांचीही हीच भूमिका होती, असे विधान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. भाजपने त्यांच्या या विधानावर टीका केली आहे. ‘जो जिना यांच्यावर प्रेम करतो तो पाकिस्तानला कसा नाकारणार?’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली आहे.