गडांवरील थडगी हिंदूंना आशीर्वाद देतील का ?

संपादकीय

गडांवरील अतिक्रमणे हटवण्यास घाबरणारे पोलीस धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण कसे करणार ?

शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर असलेला सैय्यद जलाल शाह दर्गा

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध गड आणि दुर्गावरील अवैधपणे करण्यात आलेले थडग्यांचे बांधकाम उघड झाले आहे. लोहगडावरील हुसैन बाबाचा दर्गा असो, शिवडी गडावरील हजरत सैय्यद जलाल शाह दर्गा असो, अशी महाराष्ट्रातील जणू बहुतेक गडावरील थडगी उघड झाली आहेत. ही थडगी अचानक आलेली नाहीत, तर गेल्या काही वर्षांपासून गड आणि दुर्ग यांवर ती उभारण्याचे काम नियोजनबद्धपणे चालू आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला ठार केल्यावर त्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी गाडल्याचे सांगितले. तो समुद्रात गाडला ? गाडला कि त्याची आणखी काय विल्हेवाट लावली, हे त्यांनाच ठाऊक; मात्र तो कुठे गाडला ? हे गुपित अमेरिकेने कधीच उघड होऊ दिले नाही. लादेनचा मृतदेह कुठे गाडला ? हे सांगितले असते, तर त्या ठिकाणी इस्लामचे धार्मिक केंद्र प्रस्थापित झाले असते, हे अमेरिका चांगलीच ओळखून होती. लादेनचे थडगे केवळ धार्मिक केंद्र नव्हे, तर आतंकवादाचे केंद्रस्थान झाले असते, याची जाण अमेरिकेला होती. भारताला हे काही नवे नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी मुळातच एका आतंकवाद्याचे थडगे आहे. ‘कितीही मोठा शत्रू असला, तरी त्याच्या मृतदेहाची विटंबना करू नये’, ही हिंदु संस्कृती आहे. छत्रपती शिवरायांनी हे औदार्य दाखवले. ज्या नराधमाचा महाराजांनी कोथळा काढला, त्या नराधमाचे थडगे बांधून आज तेथे नवस बोलले जात आहेत. लादेनचे थडगे मिळाले असते, तर तेथेही हाच प्रकार घडला असता. आज महाराष्ट्रातील अनेक गड आणि दुर्ग यांवर अशी थडगी निर्माण झाली. हिंदूंच्या मंदिरांमध्ये सर्वधर्म शिकवला जात असला, तरी इस्लामच्या धार्मिक स्थळांमध्ये तो शिकवला जात नाही, हे लक्षात घ्यावे. तेथे काफिरांना ठार मारून स्वर्गाला जाण्याचा मार्गच सांगितला जातो. त्यामुळे गड आणि दुर्ग यांवर निर्माण होत असलेल्या थडग्यांविषयी पुरातत्व विभाग, पोलीस आणि प्रशासन गप्प असले, तरी भविष्यात हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. अफझलखान आणि ही थडगी हिंदूंना कधीतरी आशीर्वाद देतील का ? मग शिवरायांच्या गडांवर ती कशासाठी आहेत  ? याचा जाब हिंदूंनी विचारायला हवा.

हिंदूंचा स्वाभिमान दडपण्याचे सुनियोजित षड्यंत्र

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंची अस्मिता, स्वाभिमान आहेत. गड-दुर्ग हे हिंदूंसाठी शक्तीस्रोत आहेत. एकेकाळी मराठ्यांच्या तलवारी मोगलांची चाकरी करत होत्या; मात्र छत्रपती शिवरायांनी त्यांचा स्वाभिमान जागृत केल्यानंतर याच तलवारींनी मोगलांना पाणी पाजले. ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणाने धर्माभिमानी हिंदूंचे रक्त सळसळल्याविना रहात नाही. या एका जयघोषाने धर्मांधांना चोख उत्तर द्यायला हिंदू सिद्ध होतात. आज शिवराय नसले, तरी त्यांच्या शौर्याचा इतिहास गड आणि दुर्ग यांच्या रूपात आजही हिंदूंना प्रेरणा देत आहे. हिंदूंना त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देत आहे. ‘सर्वधर्मसमभाव’, ‘धर्मनिरपेक्षता’ आदी शब्दप्रयोगांनी हिंदूंना पद्धतशीरपणे हिंदुत्वापासून तोडण्याचा प्रयत्न होत असला, तरी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने हिंदूंचा स्वाभिमान जागृत होतो. शिवराय हेच हिंदूंच्या शौर्याचे बीज आहे, हे आता धर्मांध आणि पुरोगामी मंडळींनी हेरले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवरायांनाच धर्मनिरपेक्ष ठरवण्याचा कावा चालू करण्यात आला आहे. शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्यात हिंदुत्वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्या या शक्तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागे षड्यंत्र आहे. मागील काही वर्षांपासून शिवरायांच्या सैन्यांत मुसलमान सैनिक किती होते ? याची आकडेवारी प्रसिद्ध करून शिवरायांना इस्लामप्रिय दाखवणे, हा याच षड्यंत्राचा भाग !

….मुसलमान मंदिरात माथे टेकतात का ?

वर्ष २०२१ धर्मांधांनी गडावरील बांधकामावर चादर ठेवून त्यावर वाहिलेली फुले

गड-दुर्ग यांवर इस्लामीकरण केल्यास भविष्यात गड-दुर्ग यांवर जाणार्‍या पुढच्या पिढीला गडावर थडगी आणि पीर दिसतील. आधीच सर्वधर्मसमभावाचा संसर्ग झालेली पिढी ही थडगी आणि पीर यांच्यापुढे माथे टेकेल. नुकत्याच झालेल्या ख्रिस्ती नववर्षाच्या वेळी प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘ईदच्या वेळी त्यांना मुसलमान आणि हिंदु शुभेच्छा देतात, ख्रिसमसच्या वेळी ख्रिश्चन अन् हिंदु शुभेच्छा देतात; परंतु हिंदूंच्या सणाला केवळ हिंदूच शुभेच्छा देतात’, असे ट्वीट केले होते. हे वास्तव आहे. गडांवरील थडगी आणि पीर यांच्यापुढे हिंदूंनी डोकी टेकवली, म्हणून हिंदूंच्या मंदिरात ना मुसलमान माथा टेकवतात, ना ख्रिस्ती. त्यामुळे गडावर थडगी आणि पीर हिंदूंच्या स्वाभिमानाला तिलांजली देण्यासाठीच आहेत, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

हिंदूसंघटन हाच उपाय !

हिंदूसंघटन

गडांवरील अतीक्रमणाच्या विरोधात पुरातत्व विभागाकडून पोलिसांना कळवण्याचा सोपस्कार केला जातो; मात्र कारवाईच्या ऐवजी गडांवरील अवैध बांधकामे वाढत आहेत. माहीम गडावर घुसखोरी करून धर्मांधांनी हा संपूर्ण गडच बळकावला आहे. एवढे होऊनही त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य पोलीस करत नाहीत. ‘यामुळे जातीय दंगली होतील’, असा मुलामा दिला जातो. राजकारणी अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करतात. धर्मांधांच्या भीतीने पोलीस आणि प्रशासन कारवाई करणार नसेल, तर मग कोण कारवाई करणार ?

रायगड, कुलाबा, विशाळगड, लोहगड, सरसगड, हिराकोट, मानगड, माहीम, धारावी, मलंगगड, शिवडी आदी कितीतरी नावे सांगता येतील, तेथे आता इस्लामिक धार्मिक केंद्रे उभी रहात आहेत. हे हिंदूंनी का सहन करावे ? हे सर्व गड आणि दुर्ग पुरातत्व विभागाकडे असले, तरी त्यांच्या दृष्टीने हिंदूंचे शौर्य, स्वाभिमान यांच्याशी काडीचेही देणे नाही. या गडांविषयी त्यांना आत्मियताही नाही; मात्र हिंदूंसाठी गड आणि दुर्ग यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !