राज्य सरकार शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवू शकते ! – केंद्र सरकार

  • अन्य पक्षांची सरकारे ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली श्रीमद्भगवद्गीता शिकवणे शक्य नसल्याने आता भाजपशासित राज्यांनी यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक 
  • एकीकडे अनेक जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्यांक हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला श्रीमद्भगवद्गीता आणि साधना शिकवली जाईल ! – संपादक 

नवी देहली – देशातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने संसदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले आहे.

मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी

मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या काळात विचारले होते, ‘देशातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा सरकार विचार करत आहे का ?’ यावर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की, राज्यघटनेनुसार ‘शिक्षण’ हा राज्य सरकारांचा विषय आहे. जर राज्य सरकारला वाटते की, श्रीमद्भगवद्गीता शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जावी, तर सरकार तसे करू शकते. सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस्.ई.) यांच्या अभ्यासक्रमामध्ये ७ वी आणि ८ वीच्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीतेचा काही भाग शिकवला जात आहे.