हरिद्वार (उत्तराखंड) – येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत. याविषयी महामंडलेश्वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी सांगितले, ‘या धर्म संसदेचा मुख्य उद्देश सनातन धर्माला वाचवणे, हा आहे. संपूर्ण जगात अहिंदूंची संख्या वाढत आहे. ‘वर्ष २०२९ मध्ये भारताचा पंतप्रधान अहिंदू असेल’, असे सांगितले जात आहे. ही सर्वाधिक वाईट स्थिती असू शकेल. यापासून कसे वाचता येईल, यावर या धर्म संसदेत चर्चा केली जाईल. आज जगात जितक्याही कट्टरतावादी संघटना आहेत, त्यांचे लक्ष्य भारतच आहे.’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तराखंड > सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन
सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन
नूतन लेख
- हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !
- पाकिस्तानचे ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध)
- भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख !
- पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !
- विद्यार्थ्यांनी आदर्श राष्ट्रभक्त नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !