लव्ह जिहादपासून केवळ धर्मशिक्षणच मुलींना वाचवू शकते ! – कु. श्रुती ओ, आर्ष विद्या समाजम्, थिरूवनंतपूरम्

कु. श्रुती ओ

लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. पूर्वी खोटे बोलून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करायचे. आता मात्र मुलींना भावनिक पद्धतीने फसवून, त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात असे अडकवले जाते की, मुली धर्मांतर करण्यास सहज सिद्ध होतात. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका अभ्यासक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन त्यांना परत आणले आहे. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.