(म्हणे) ‘दंगल घडवण्यासाठी भाजपने पैशांचे वाटप केले !’ – नवाब मलिक

रझा अकादमीला सोडून नवाब मलिक यांची हिंदूंना दंगलखोर ठरवण्याची उठाठेव !

नवाब मलिक

मुंबई – सर्व हत्यारे समाप्त होतात, तेव्हा भाजप दंगलीचे हत्यार बाहेर काढून स्वत:चे राजकारण करतो. हा भाजपचा हातखंडा आहे. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे पाठवण्यात आले होते. तेथील आमदारांकडून लोकांना पैसे वाटले गेले. राज्यातील जनता पूर्णपणे जाणकार आहे आणि असे राजकारण कधीही स्वीकारणार नाही. अशा विनाशकारी राजकारणाचा आम्ही निषेध करतो. भाजपने असे राजकारण करू नये, असे वक्तव्य अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी १५ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.