नेपाळने सीमा ओलांडू नये ! – भारताची चेतावणी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ११ नोव्हेंबरपासून १२ व्या जनगणनेला प्रारंभ झाला आहे. नेपाळने भारताच्या सीमेवरील काही भागांवर दावा केला आहे. तेथे उपग्रहाद्वारे जनगणना केली जाऊ शकते, असे नेपाळने म्हटले आहे. त्यावर भारताने नेपाळला सीमा न ओलांडण्याची चेतावणी दिली आहे.
नेपाल कालापानी में उपग्रह से करेगा जनगणना, भारत ने कहा- हद न लांघें
और अधिक खबरें व मुफ्त ई-पेपर पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऐप इंस्टॉल करें – https://t.co/hO3HVqcM49 #nepal @PMOIndia #kalapani pic.twitter.com/QaY5yCOZn5
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 13, 2021
१. नेपाळच्या सांख्यिकी विभागाचे महासंचालक नेबिन लाल श्रेष्ठ म्हणाले की, आम्ही देशाच्या अधिकृत मानचित्रातील सर्व ठिकाणी जनगणना करणार आहोत. भारत सरकारने अनुमती दिल्यास आम्ही लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागांतही घरोघर जाऊन माहिती गोळा करणार आहोत. अनुमती मिळाली नाही, तर आमच्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नाही; म्हणूनच उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या साह्याने ही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उपग्रहाद्वारे आम्ही या क्षेत्रातील घरे, तसेच तेथील रहिवासी यांच्या संख्येचा अंदाज लावणार आहोत.
२. यावर भारताने म्हटले की, नेपाळकडून भारताच्या सीमेमध्ये काही हालचाली झाल्यास त्या मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin