नेपाळने सीमा ओलांडू नये ! – भारताची चेतावणी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ११ नोव्हेंबरपासून १२ व्या जनगणनेला प्रारंभ झाला आहे. नेपाळने भारताच्या सीमेवरील काही भागांवर दावा केला आहे. तेथे उपग्रहाद्वारे जनगणना केली जाऊ शकते, असे नेपाळने म्हटले आहे. त्यावर भारताने नेपाळला सीमा न ओलांडण्याची चेतावणी दिली आहे.
नेपाल कालापानी में उपग्रह से करेगा जनगणना, भारत ने कहा- हद न लांघें
और अधिक खबरें व मुफ्त ई-पेपर पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऐप इंस्टॉल करें – https://t.co/hO3HVqcM49 #nepal @PMOIndia #kalapani pic.twitter.com/QaY5yCOZn5
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 13, 2021
१. नेपाळच्या सांख्यिकी विभागाचे महासंचालक नेबिन लाल श्रेष्ठ म्हणाले की, आम्ही देशाच्या अधिकृत मानचित्रातील सर्व ठिकाणी जनगणना करणार आहोत. भारत सरकारने अनुमती दिल्यास आम्ही लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागांतही घरोघर जाऊन माहिती गोळा करणार आहोत. अनुमती मिळाली नाही, तर आमच्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नाही; म्हणूनच उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या साह्याने ही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उपग्रहाद्वारे आम्ही या क्षेत्रातील घरे, तसेच तेथील रहिवासी यांच्या संख्येचा अंदाज लावणार आहोत.
२. यावर भारताने म्हटले की, नेपाळकडून भारताच्या सीमेमध्ये काही हालचाली झाल्यास त्या मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण